शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

एक कदम (अ)स्वच्छता’ की ओर...कोल्हापूर शहर स्वच्छ राहीलच कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 01:15 IST

एका हाताने कधी टाळी वाजतही नाही आणि टाळीसाठी दोन्ही हात एकत्र करायचेच नाहीत, हा अलिखित नियम आपल्या समाजाने अमलात नाही आणला तर नवलच.

कोल्हापूर : एका हाताने कधी टाळी वाजतही नाही आणि टाळीसाठी दोन्ही हात एकत्र करायचेच नाहीत, हा अलिखित नियम आपल्या समाजाने अमलात नाही आणला तर नवलच. सर्वच स्तरावर स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणावर अभियान राबविण्यात येत असताना ‘गांधारी’ची भूमिका बजावणाऱ्यांना जागरूक करणे कठीण काम आहे. कोल्हापुरातील रेल्वेफाटक परिसरातील भिंतीवर महानगरपालिकेने स्वच्छता अभियानासाठी फलक लावूनही तेथे असा मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचा ढीग पहावयास मिळतो.

कोल्हापूर शहर स्वच्छ राहावे म्हणून महापालिकेतर्फे अनेकदा स्वच्छता अभियान राबविण्याबरोबरच ठिकठिकाणी जनजागृतीसाठी सुंदर-आकर्षक फलक लावण्यात आले आहे; तरीही स्वच्छता राखा असे फलक नजरेसमोर दिसत असतानाही काही छोटे-मोठे व्यावसायिक, नागरिक, भाजीपाला विक्रेते हे बिनधास्तपणे शहरातील राजारामपुरी रोडसमोर रेल्वेफाटकजवळ असा कचरा टाकून आपल्या अस्वच्छ मनाच्या संस्कृतीचे दर्शन घडवित आहेत.

त्यामुळे हे शहर स्वच्छ राहीलच कसे? या अस्वच्छतेला नेमके कोण जबाबदार असा प्रश्न निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी असे दृष्य कोल्हापुरात पहायला मिळते. जिथे जिथे महापालिका प्रशासनाने स्वच्छता अभियानविषयी जनजागृतीचे फलक लावले आहेत, नेमके त्याचठिकाणी काही नागरिक बिनधिक्कतपणे कचरा टाकण्याचे धाडस करून आपल्या स्वच्छ शहराचा चेहरा अस्वच्छ बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे महापालिकेने शहर स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करायचा आणि नागरिक कचरा करण्यासाठी पुढे येत असतील, तर अशा अस्वच्छ शहराचा चेहरा बनविण्यासाठी नेमके कोण जबाबदार असाच सवाल येथे उपस्थित होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान